Wednesday, 2 November 2011

CHALA SURUVAT KARU YA.

चला  सुरुवात  करू  या .


         “घडवू  आपण  आपल्याला ” याची  सुरुवात  कोणत्याही  वयात   सुरु  करता  येईल . याबाबत  मी  माहिती  देणारच  आहे . मला  माझे  अनुभव  आपल्यालासंगून   हे  पटवून  द्यायचे  आहे . अनेक  दिवस  मनात  घोळत  असलेला  विचार  प्रथम  मांडावा  ही  इच्छा  आहे .
         आपण  सर्वांनी  याची  सुरुवात  स्वतापासून  करावी . हाच  मंत्र  घरातील  प्रत्येकाला  द्यावा . याही  पेक्षा  घरातील लहान  मुलांवर  जास्त  लक्ष  केंद्रित  करावे . मला  नेहमी  वाटते , मुलांचे  शिक्षण  चालू  असतानाच  त्यांना  त्यांचा  क्षमतांची  जाणीव  करून  देणे  गरजेचे  आहे . सद्याच्या  धावपळीच्या  जगात  वेळ  नाही ही  सबब  सारेच  सांगतात  पण  धावायचे  कोणी  थांबत  नाही . लग्न  संसार  करतातच  ना . यातून  येणारे  कुटुंब . त्यांची  सुख -दुख  व  जबाबदाऱ्या  खूप  महत्वाच्या  आहेत . जीवनातील  अनेक  क्षण  आपण  आपल्या  प्रिय  कुटुंबाबरोबर  घालवत  असतो . कुटुंबातील  प्रत्येक  सदस्याला  वेळ  देतो . कुटुंबाचा  मूळ  आधार  काय  असेल  तर  तो  “सुसंवाद ” आहे . याकडे  आपण  पाहूच .
मुला -मुलीना  आपण लहानपणापासून  शिकवतो  . तू  मुलगा  आहे . तू  मुलगी  आहे . खरतर  शारीरिक  बदल  त्यांच्यामध्ये  घडेपर्यंत  काहीच फरक  नसतो . तरीसुद्धा  आपणच  त्यांना  सतत  जाणीव  करून  देत  असतो  व  नकळत  संस्कार  करीत  असतो . तू  मुलगी  आहे , असेच  वागायचे . तो  मुलगा  आहे  तो  असेच  वागणार  हे  आपण  गृहीत  धरतो . तशी  मानसिकता  बनवितो . वागतो .  तसे  इतरांना  करायला  लावतो . येथेच  आपण  पहिली  चूक  करतो . मुलगा  किवा   मुलगी  असा  भेद  न करता  “माणूस ” म्हणून  एक  व्यक्ती  म्हणून  विकसित  होवू  देणे  गरजेचे  आहे . यामुळे  लैंगिक  आकर्षण  कमी  होईल . पुढे  होणारे  अत्याचार  कमी  होतील . हल्ली  बाजारात  अनेक  पुस्तके  उपलब्ध  आहेत . वाचनाची  आवड  कमी  व  गरोदर  काळात  वाचली  जातात  ती  धार्मिक  पुस्तके . हजारो  वर्षे  “धार्मिक  गुलामगिरी  आपल्या  मानगुटीवर  बसलेली  आहे . ती  सहजासहजी  लगेच  जाणार  का ? तर  नाही . जर  ती  माझ्या  डोक्यातच  आहे . काय  योग्य  व  अयोग्य  हे  कळायला  लागल्यावर  तरी  माणसाने  बदलले  पाहिजे . बदलेल  तो  माणूस  कसला . यासाठीच  द्यावयाचा  आहे  मंत्र ”घडवू  आपण  आपल्याला ”.
मुलामुलींना स्वतंत्र  विचाराने  धार्मिक  गुलामगिरीत  न अडकता  विकसित  केले  पाहिजे .विज्ञान  व  मानसशास्त्राने   संशोधन  करून  खूपच  प्रगती  केलेली  आहे .ती  आपण  समजावून  घेवून  त्याचे  प्रयोग  आपल्या  घरी  केले  पाहिजेत . घरातील  मुलांचे   आदर्श  कोण ? त्याचे  पहिले  गुरु  कोण ? आपण  असतो . आपण  जे  करतो  तेच  ते  बरोबर  समजतात. तसाच  ते  विचार  करतात. तसेच   वागतात. यामुळे  आपणच  कसे   चुकणार  नाही  हे  पहिले  ठरविले  पाहिजे . जे  मुलांनी  केले  नाही  पाहिजे  वाटते  ते  आपण  करायला  नको . ज्यांची  गरज  आहे  ते  केले  पाहिजे . आजूबाजूला  घडणाऱ्या  घटनांची  वास्तव  व  खरी  माहिती  दिली  पाहिजे . कावला , बागुलबुवा , भूत  अंधार , भीती  यापासून  त्यांना  दूर  ठेवले  पाहिजे . त्याला  काय  कळते  म्हणून  तुम्ही  वेळ  मारून  नेता , तेथेच  चुकता . म्हणून  मी  म्हणतो  चला  सुरुवात  करू   आजच ! वेळ  गेलेली  नाही . आपण  सुरुवात  करू  तोच  चांगला  मुहूर्त  समजा .  

                                                                                         (ज्ञानेश्वर मोळक )
                                                                                                                                                                                                                                 

No comments:

Post a Comment